अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
राहूरी प्रतिनिधी: अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरीकांना मदत उपब्लध्द करून द्यावी. मोठ्या स्वरुपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात अश्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपतीची माहीती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडून घेतली. अतिवृष्टीने नागरीकांचे
हाल होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरीकांना सुरक्षास्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या १५ लोकांची तसेच कासारपिंपळगाव येथील १६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, सर्व रहीवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत. कर्जत तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्याने वेढा दिला या कुटंबातील ५ व्यक्तिंना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे.नैसर्गिक संकटाने नूकसान
झालेल्या रहीवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या असून, पुढील दोन दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने अति पावसाचा दिलेला इशारा विचारात घेवून उपाय योजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्दे श देण्यात आले आहेत.
१९ महसूल मंडळात आर्थिक आर्थिक नुकसानर विवारी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने१९ महसूल मंडलातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटास सामोरे जावे लागले. यामध्ये पारनेर तालुक्यातील ३, पाथर्डी तालुक्यातील ३, श्रीगोंदा तालुक्यातील ८, कर्जत तालुक्यातील ५ मंडलाचा समावेश आहे. काही भागात घरांची पडझड तसेच शेती पिकांचे नूकसान झाले. मात्र पूर परीस्थिती असल्यानंतर नूकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या तरी नागरिकांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले. असल्याची माहिती त्यांनी दिली वअतिवृष्टीने बाधीत नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.