अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
श्रीरामपूर प्रतिनिधी : पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो. समाजातील सुखदुःखाची पत्रकारांना जाणीव असते. समाजातील प्रश्न व समस्या मांडण्याचे व त्या सोडवीण्याचे काम पत्रकार करतात. पत्रकारच सुसंस्कृत समाज घडवतात, असे प्रतिपादन क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.
स्वतंत्र्यदिनी व श्रीकृष्ण जन्मदिनी जेष्ठ पत्रकार ॲड. बाळासाहेब तनपुरे यांनी लिहिलेल्या कटूसत्य या आत्मचरित्राचे प्रकाशन देवगड येथील यात्री निवास सभागृहात भास्करगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. नाशिकच्या कालीका मंदिर समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. रामायणाचार्य नंदकिशोर खरात महाराज, नाशिकचे पत्रकार भाई सोनार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विजया अंबाडे, विमल तनपुरे, भागवतराव मुठे, बापूसाहेब पटारे नउपस्थित होते.
प्रतापराव तनपुरे यांनी स्वागत केले. श्रीरामपूरच्या वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. विश्वाससराव तनपुरे, नानासाहेब तनपुरे, भागिरथ तनपुरे, अथर्व तनपुरे, प्रतिक तनपुरे, रामकृष्ण तनपुरे, नितीन तनपुरे, शिवाजीराव कवडे, प्रशांत कवडे, मुरुमे गावचे सरपंच अजय साबळे, डॉ.
ऋषीकेश निगळ यांनी मान्यवरांचा सत्कार केला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
भास्करगिरी महाराज म्हणाले की, पत्रकार बाळासाहेब तनपुरे हे जसे उत्तम पत्रकार आहेत तसे सिद्धहस्त साहित्यीकही आहेत. निर्भिडपणे व सत्त्य लिखाण हे त्यांचे वैशिष्टय आहे. त्यांचे कटूसत्य हे आत्मचरित्र वाचकांना निश्चितच आवडेल. खरात महाराज म्हणाले की, घराचे घरपण, गावाचे गावपण व माणसाचे माणुसपण जपले पाहिजे. अन्वी तनपुरे, संस्कृती तनपुरे, विजया अंबाडे, पुस्तकाचे लेखक बाळासाहेब तनपुरे, बाळकृष्ण भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. भारत कवडे यांनी आभार मानले. प्रा. संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास संभाजीराव कारले, बाळासाहेब निगळ, नानासाहेब अंबाडे, रोहिणी तनपुरे, पुप्षा तनपुरे, भक्ती तनपुरे, आनंद सोनवणे, कृष्णा कदम, प्रकाश थेवरकर, भाऊसाहेब बानकर, गणेश कवडे, संदीप दांगट, दगडू बडाख, यशवंत तुपे, बाळासाहेब अडसुळे, रामदास गावंडे, सोनु साबळे, पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, अशोक डहाळे, सुनील गर्जे, विनायक दरंदले व रामदास कोरडे, बाळासाहेब गवळी, नाशिकचे विजय पाटील, भास्कर शिंदे, बाळासाहेब गायकवाड, सत्यजित पाटील, यश कवडे, राजेंद्र कहांडळ, अभिषेक दरंदले यांच्यासह पत्रकार, साहित्यीक उपस्थित होते.